पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचा मंडप कोसळला

108

पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचा लग्नमंडप कोसळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघरमधील ऐना भागात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न होत होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वा-यामुळे हा मंडप कोसळला असून यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

काय झाले नेमके?

पालघर जिल्ह्यातील ऐना या गावी शिवसेना आणि केसरी फांउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 125 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा संपन्न होत असताना अचानक जोरदार वादळी वारा सुटल्याने लग्नाचा मंडप कोसळला. यावेळी उरस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला. तेथील लोकांनी लग्न मंडपातून लगेच पळ काढला. पण तरीही या दुर्घटनेत एकूण चार जण जखमी झाले आहेत.

(हेही वाचाः मनसे उद्धव ठाकरेंना देणार मुन्नाभाईची डिव्हीडी)

मोठी दुर्घटना टळली

दरम्यान कोसळलेला मंडप पुन्हा उभारण्यात येत असून, जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंडपात एकूण 125 जोडपी आणि त्यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. अचानक आलेल्या वादळी वा-यामुळे उपस्थितांनी परिस्थितीचे भान ओळखत पटकन मंडपातून पळ काढला. त्यामुळे फार मोठा अपघात टळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.