शरद पवार (Sharad Pawar) केंद्रात कृषिमंत्री पदावर असूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना टीका केली होती. मोदींनी केलेल्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
पंतप्रधान हे एक संवैधानिक पद आहे. संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, हे मला समजतं. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. मोदींनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींना उत्तर दिलं आहे.
तसेच पंतप्रधानांनी कशासाठी वक्तव्य केलं माहित नाही. पंतप्रधानांनी देशात काय घडतंय? पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य चुकीच्या माहितीमुळे करण्यात आल्याचं दिसतंय. माहिती नसताना वक्तव्य करण्यास धाडस लागतं. मोदी तुमच्यावर टीका का करत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना, शरद पवारांनी सांगितलं की, ‘देशात अस्वस्थता आहे. अनेक राज्यांत लोकं बदलाच्या विचारात आहेत. गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात फोडाफोडी करून सरकार आणलं. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब आणि देशातील बहुसंख्य राज्यात भाजपाकडे सत्ता नाही. याचा धसका घेतल्याने मोदींनी या गोष्टी मांडल्या.’
(हेही वाचा – SP vs Congress : सपाच्या वोटबॅंकेवर काँग्रेसची वक्रदृष्टी; अखिलेश यादव राहुल गांधीवर नाराज? )
विधानसभा निवडणुकांमध्ये बदल दिसतोय, पण लोकसभा निवडणुकांबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. ‘इंडिया आघाडी’च्या कामाला गती द्यावी लागेल. लोकांना आमच्याकडून अपेक्षा असल्याचेही यावेळी पवार म्हणाले. ‘
Join Our WhatsApp Community