Monsoon : 25 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात

63
नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागाने मोठी घोषणा केली. 25 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान येथून परतीच्या पावसाला (Monsoon) सुरुवात होईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.
सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस  (Monsoon) कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचे चित्र आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सून अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाने दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची  (Monsoon) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.