Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम म्हणजे दुसरा स्वातंत्र्योत्सव, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे प्रतिपादन

1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता.

113
Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम म्हणजे दुसरा स्वातंत्र्योत्सव, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे प्रतिपादन
Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम म्हणजे दुसरा स्वातंत्र्योत्सव, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे प्रतिपादन

अयोध्येत साकारले जाणारे प्रभू श्रीरामाचे मंदिर (Ram Mandir) परकीय आक्रमकांच्या हल्ल्याचे परिमार्जन असून अयोध्येत २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम म्हणजे दुसरा स्वातंत्र्योत्सव असल्याचे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यांनी केले. हिंदुस्थान समाचार बहुभाषी वृत्तसंस्थेच्या सहभाग आणि पुढाकाराने धर्मनगरी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी चंपत राय यांनी नवोत्थान मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनदेखील केले.

यावेळी राय म्हणाले की, 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता. मोठा भूखंड ताब्यात घेतला. त्यानंतर 1963 मध्ये भारतीय संसदेने चीनच्या ताब्यातील इंच इंच जमीन परत घेण्याचा ठराव मंजूर केला. संसद ही भारतीय समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने संसदेच्या प्रस्तावाला विशेष महत्त्व आहे. परंतु, आज इतक्या वर्षानंतरही आपण एक इंच जागा परत घेऊ शकलो नसल्याची खंत राय यांनी व्यक्त केली. परकीय व्यक्तीने केलेला हल्ला हा राष्ट्राचा अपमान आहे. रशिया आणि युक्रेन आणि इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा संदर्भ देत चंपत राय म्हणाले की, हे सर्वजण आपल्या अपमानासाठी आणि अस्तित्वासाठी लढत आहेत. राष्ट्राचा अपमान दुरुस्त करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – ISRO : १ जानेवारीला पहिले ध्रुवीय मिशन लाँच होणार, अंतराळातील भारताची तिसरी वेधशाळा)

राष्ट्राच्या आणि सन्मानाच्या मंदिराचा मुद्दा

श्री राम मंदिराची निर्मिती ही अशाच भावनांचे फलित आहे. अयोध्येत 3000 मंदिरे असतील. येथील सर्व संत-महात्म्यांनी युद्धे केली. राम मंदिरासाठी आजवर असंख्य युद्धे आणि प्रदीर्घ संघर्ष झाला. कधी अयोध्येतील समाज तर कधी हनुमानगडच्या लोकांनी हा संघर्ष सुरू ठेवला. कधी दिगंबर तर कधी निर्मोही आखाड्याने हे संघर्ष चालू ठेवले. कारण, हे आपले आराध्य दैवत श्री राम यांचे जन्मस्थान आहे. या पृथ्वीवर दुसरे कोणतेही जन्मस्थान असू शकत नाही. जन्मस्थान हस्तांतरणीय नाही. म्हणून हे आपल्या देवाच्या जन्मस्थानाचे मंदिर आहे. हा संघर्ष केवळ श्रीराम मंदिराचा लढा नव्हता. राष्ट्राच्या मंदिराचा आणि सन्मानाच्या मंदिराचा मुद्दा होता असे राय यांनी सांगितले.

भारतीयाने मंदिराच्या उभारणीत हातभार लावला

चंपत राय म्हणाले की, श्री राम मंदिराच्या उभारणीत कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेचा पाठिंबा नाही. कोट्यवधी लोकांच्या सहकार्याने ते उभारले जात आहे. प्रत्येक भारतीयाने मंदिराच्या उभारणीत हातभार लावला आहे हे समजून घ्या. भारतातील कोट्यवधी लोकांच्या परिश्रमाने ते उभारले जात आहे. त्याच्या बांधकामात 1000 वर्षांची मेहनत आणि त्यागांचा समावेश असल्याचे राय यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.