पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. (Pahalgam Terror Attack) बंद दाराआड संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) बैठक होत आहे. सुरक्षा परिषदेत बंद खोलीत भारत-पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या स्थितीवर चर्चा व्हावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला जाणार असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
(हेही वाचा – Paud Temple : अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या चाँद नौशाद शेखवर गुन्हा दाखल ; Video Viral)
भारताकडून होणाऱ्या आक्रमक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज ही बैठक होत आहे. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे आणि जुलैमध्ये होणाऱ्या १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र संस्थेचे तो अध्यक्षपद भूषावेल.
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानी सदस्य असीम इफ्तिखार अहमद (Aseem Iftikhar Ahmed) यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, हे सर्व जम्मू काश्मीरात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
पाकिस्तानची रशियाकडे मदतीची मागणी
भारत-पाकिस्तान युद्धाच्या भीतीने पाकिस्तानी उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी रशियाच्या (Russia) परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधला. भारतासोबत रशियाची भागीदारी असून पाकिस्तानशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे रशियाने मध्यस्थी करावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यावर आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत; पण त्यासाठी इस्लामाबाद (Islamabad) आणि नवी दिल्लीची इच्छा असावी, असे सांगत भारताने चर्चेवर सहमती दाखवण्याची अट रशियाने पाकिस्तानसमोर ठेवली. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community