Narendra Modi: भारतीय मूल्यांमध्ये रुजलेली शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज – पंतप्रधान मोदी

228
Share Market: पंतप्रधान मोदींनी 'या' कंपनीच्या प्रकल्पाला दाखवला हिरवा कंदील, शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये चढाओढ
Share Market: पंतप्रधान मोदींनी 'या' कंपनीच्या प्रकल्पाला दाखवला हिरवा कंदील, शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये चढाओढ

भारतीय मूल्यांमध्ये रुजलेली शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती (Swami Dayanand Saraswati, founder of Arya Samaj) यांच्या 200व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या मोर्बी जिल्ह्यातील तांकरा येथे आयोजित कार्यक्रमाला ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. (Narendra Modi)

देशभरातील लोक गुलामगिरी आणि अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकले असताना भारतीय समाजाने वेदांकडे परत यावे यासाठी वकिली करणाऱ्या समाजसुधारकाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

“भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. आर्य समाजाच्या शाळा यासाठी केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देश आता त्याचा विस्तार करत आहे. या प्रयत्नांशी समाजाला जोडणे ही आपली जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले.

(हेही वाचा – CAPF Recruitment : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांत परीक्षा)

स्वामी दयानंद यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि ते हरियाणामध्ये सक्रिय होते. पंतप्रधानांनी दोन्ही प्रदेशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल भाष्य केले आणि स्वामी दयानंद यांचा त्यांच्या जीवनावर असलेला सखोल प्रभाव मान्य केला, ते म्हणाले, “त्यांच्या शिकवणीने माझा दृष्टीकोन व्यापक झाला आहे आणि त्यांचा वारसा माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे”.

‘वेदांकडे परत जाण्याचे’ आवाहन

वैदिक ज्ञानाचे सार पुन्हा शोधण्याच्या चळवळीचे नेतृत्व करत, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून भारताला जागृत करण्यात समाजसुधारकाने बजावलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. “जेव्हा आपली परंपरा आणि आध्यात्मिकता लुप्त होत होती, तेव्हा स्वामी दयानंद यांनी आम्हाला ‘वेदांकडे परत जाण्याचे’ आवाहन केले”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, वेदांवर विद्वत्तापूर्ण भाष्य आणि तर्कशुद्ध अर्थ लावण्याच्या स्वामीजींच्या प्रयत्नांवर त्यांनी भर दिला.

आणि लोकांना वैदिक धर्म कळू लागला…

“ब्रिटिश सरकारने आम्हाला कनिष्ठ म्हणून चित्रित करण्यासाठी आमच्या सामाजिक कुप्रथांचा एक साधन म्हणून वापर केला. असे सांगून ते पुढे म्हणाले की, आर्य समाजाच्या संस्थापकांनी वेदांवर तार्किक स्पष्टीकरण दिले, रुढीवादी विचारांच्या रूढिबद्धतेवर उघडपणे हल्ला केला आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप काय आहे हे स्पष्ट केले. “याचा परिणाम असा झाला की, समाजात आत्मविश्वास परत येऊ लागला. लोकांना वैदिक धर्म कळू लागला आणि त्यांच्या शिकवणीशी जोडले जाऊ लागले, असे  सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले, “लाला लाजपत राय, रामप्रसाद बिस्मिल आणि स्वामी श्रद्धानंद यांच्यासारख्या क्रांतिकारकांची मालिका उदयाला आली, ज्यावर आर्य समाजाचा प्रभाव होता. त्यामुळे दयानंदजी केवळ वैदिक ऋषीच नव्हते तर राष्ट्रीय चेतनेचे ऋषीही होते “.

महिला सक्षमीकरणात देशाची प्रगती
जगभरातील आर्य समाज संस्थांच्या व्यापक पसरलेल्या जाळ्याचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “2,500 हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे, विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या 400 हून अधिक गुरुकुलांसह, आर्य समाज हा आधुनिकता आणि मार्गदर्शनाचा एक चैतन्यदायी पुरावा आहे”. 21 व्या शतकात राष्ट्र उभारणीची जबाबदारी नव्या जोमाने स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी समुदायाला केले. दयानंद अँग्लो वैदिक (डीएव्ही) संस्थांना ‘स्वामीजींची जिवंत स्मृती’ असे संबोधत पंतप्रधानांनी त्यांचे सक्षमीकरण सुरूच ठेवण्याचे आश्वासन देऊन मोदींनी आज नवीन धोरणे आणि देश महिला सक्षमीकरणात प्रगती करत असल्याचे म्हटले आहे.

महर्षींना योग्य आदरांजली
“काही महिन्यांपूर्वीच, देशाने नारी शक्ती वंदन अधिनियम लागू केले, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण शक्य झाले. ही महर्षींना योग्य आदरांजली ठरेल “, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या युवकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या ‘मेरा युवा भारत’ या स्वायत्त संस्थेशी संलग्न होण्यासाठी त्यांनी डीएव्ही शैक्षणिक नेटवर्कच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.