मुंबई जवळील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून प्रवासी खाली पडून दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या चौकशीची तक्रार मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) अधिवक्ता आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे. (Mumbra Train Accident) रेल्वे दुर्घटनेची चौकशी करून या दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. मुंब्रा दुर्घटना ही रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे घडली असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणारे १३ प्रवासी खाली कोसळून अपघात घडला होता. या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अन्य ९ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी वसईत रहाणारे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय (Ashish Rai) यांनी मानवी हक्क आयोगात धाव घेतली आहे. या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या घटनेला रेल्वे अधिकारी व व्यवस्थापन जबाबदार असल्याचे आशिष राय यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.
तक्रारीत काय म्हटले आहे ?
यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना रेल्वेच्या अपघाताच्या घडल्या आहेत. त्यातून रेल्वेने बोध घेऊन योग्य त्या उपाययोजना आखणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने अशा घटना समोर येत आहेत. या घडलेल्या रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी यात जे अधिकारी व व्यवस्थापन जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राय यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारीद्वारे केली आहे. (Mumbra Train Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community