अंबरनाथमधील भंगारगल्लीत पुन्हा भीषण आग; तीन गोदाम जळून खाक

67

अंबरनाथच्या भंगारगल्लीत पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे भंगाराच्या गोदमांना आग भडकल्याचे समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की धूराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीमध्ये तीन गोदाम भक्ष्यस्थानी आली आहेत. शिवाय इतर गोदामांनाही धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ११ मार्चला अंबरनाथमधील याच भंगारगल्लीतील केमिकल कंपनीत भीषण अग्नितांडव झाला होता. या आगीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. कंपनीतील सर्व वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या होत्या.

(हेही वाचा – माहिम किल्ल्यावरील अतिक्रमण हटवले; झोपडीधारकांना विशेष प्रकल्पातंर्गत पर्यायी निवास व्यवस्था)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.