Maratha Reservation : मराठा आंदोलकांकडून जाळपोळ; कारवाईला विरोध करत आंदोलकांनी जाळली एसटी

प्रशासनाने भांबेरी गावाबरोबरच संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या हजारो मराठा आंदोलक जरांगे-पाटील मुक्कामी राहिलेल्या भांबेरी गावामध्ये आहेत.

244
Maratha Reservation : मराठा आंदोलकांकडून जाळपोळ; कारवाईला विरोध करत आंदोलकांनी जाळली एसटी

भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या (manoj jarange patil) २ सहकाऱ्यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही मराठा आंदोलनामध्ये सक्रीयपणे सहभागी आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रात्रीपासूनच भांबेरी गावामध्ये मराठा समाजातील (Maratha Reservation) कार्यकर्त्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar: प्रभू रामचंद्र आणि वीर सावरकर)

आंदोलकांकडून जाळपोळ :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर रविवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा सामाजाचे (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या २ सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचे पडसाद घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये उमटले असून मराठा आंदोलकांनी या अटकेला विरोध करत एक एसटी बस जाळली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!)

जरांगे सागर बंगल्यावर धडकणार :

अंतरवाली सराटी येथे रविवारी समाजातील सदस्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी (Maratha Reservation) फडणवीसांना माझा बळी हवा आहे असं म्हणत आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं. तसेच संतापलेल्या जरांगे-पाटलांनी थेट मुंबईमधील फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर आपण जाणार असल्याचं म्हटलं. भाषण संपता संपता अस्वस्थ झालेले जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणावरुन उठून चालू लागले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न अनेक सहकाऱ्यांनी केला मात्र जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी आपला प्रवास सुरुच ठेवला. रविवारी रात्रीचा मुक्काम जरांगे-पाटील यांनी भांबेरी गावात केला.

मराठा आंदोलक आक्रमक :

दरम्यान मनोज जरांगे-पाटलांबरोबचे (Maratha Reservation) मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी जालना जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली.

(हेही वाचा – Weather Update : देशासह राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता तर विदर्भासाठी ‘ऑरेंज अलर्ट जारी)

संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त :

प्रशासनाने भांबेरी गावाबरोबरच संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या हजारो मराठा आंदोलक जरांगे-पाटील मुक्कामी राहिलेल्या भांबेरी गावामध्ये आहेत. सकाळी १०:३० ते ११ दरम्यान जरांगे आपल्या समर्थकांबरोबर मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु करतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.