Manoj Jarange Patil : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जरांगे पाटील यांना पाठिंबा; एक दिवस बाजार समिती बंद

77
Manoj Jarange Patil : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जरांगे पाटील यांना पाठिंबा; एक दिवस बाजार समिती बंद

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (Manoj Jarange Patil) त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आजपासून मी उपोषणाला बसत आहे. सरकार आमच्या वेदना समजेल, अशी आशा होती; पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला, ४१ वा दिवस उजाडला तरी, सरकार मराठा आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. (Manoj Jarange Patil)

आज म्हजेच शुक्रवार २७ ऑक्टोबर हा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा सलग तिसरा आहे. दरम्यान त्यांच्या या उपोषणाला आणि मागणीला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) आज संपूर्ण बंद राहणार आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व माथाडी कामगारांनी एकत्रित येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केटसह सर्व मार्केट बंद राहणार आहे.

(हेही वाचा – TVS Fiero 125 : टीव्हीएस कंपनीची महेन्द्र सिंह धोनीला आवडलेली बाईक तुम्ही बघितली आहे का?)

सरकार दिशाभूल करत आहे

उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मी अन्न-पाणी घेणार नाही, औषधे घेणार नाही. गावात कुणी आले, तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन गावकऱ्यांना केले आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेने करा, आत्महत्या करू नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपला, ४१ दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)

सरकार आणि मुख्यमंत्री यांचा आणि सर्व पक्षांचा सन्मान घेऊन, त्यांनी (पक्षांनी) सर्वांनी मिळून ठराव घेऊन, आम्ही 40 दिवस दिले. सरकारकडून कालपर्यंत आशा होती मात्र, सरकारकडून आणि सर्वच पक्षांकडून आमची निराशा झाले नाही, त्यामुळे आज आमरण उपोषण सुरू केले आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Manoj Jarange Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.