महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत सक्षम होईल; CM Devendra Fadnavis यांचा विश्वास

44
मुंबईत रंगणार देशातील पहिला 'Maharashtra Radio Festival'; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २१ जूनला ‘आशा रेडिओ पुरस्कार’ प्रदान सोहळा
  • प्रतिनिधी

हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ ठिकाणासाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती दिली.

(हेही वाचा – दहशतवादी Hashim Musa निघाला पाकिस्तानी सैन्याचा कमांडो; पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका)

उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत तसेच हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३ हजार १४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २ हजार ११० मेगावॅट क्षमतेच्या तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३ हजार ६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

(हेही वाचा – गुजरात पोलिसांनी Bangladeshi Infiltrators च्या अवैध वस्तीवर चालवला बुलडोझर)

महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅट, निवे येथे १२०० मेगावॅट आणि येथे वरंधघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि शिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

यावेळी जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ) तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.