-
प्रतिनिधी
महाराष्ट्राला माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राची राजधानी बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी’ स्थापन केला आहे. या निधीअंतर्गत स्टार्टअप्ससाठी (Startup) ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. उद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, या निधीच्या माध्यमातून शाश्वत व्यवसाय उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
(हेही वाचा – धर्मादाय रुग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक तयार करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)
राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान आणि सहाय्यभूत सेवा क्षेत्रात ९५ हजार कोटींची गुंतवणूक आणि ३५ लाख नवीन रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, १० लाख कोटींची निर्यात साध्य करण्याचा मानस आहे. नासकॉमच्या २०२३ च्या अहवालानुसार, भारतीय आयटी क्षेत्राचा वार्षिक महसूल २१ ट्रिलियन रुपये असून, तो २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्सना (Startup) सुरुवातीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
(हेही वाचा – CC Road : काँक्रिटच्या रस्त्यांवरील सांधे भरण्यासाठी डांबर भरण्याचा पर्याय अयशस्वी; अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ निर्देश)
हा निधी माहिती तंत्रज्ञान, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), स्पेशल कॉम्प्युटिंग, बिग डेटा ॲनालिसिस, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन या क्षेत्रातील व्यवसायांना गुंतवणुकीद्वारे सहाय्य करेल. निधीच्या मंजुरी आणि वितरणासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्राथमिक मंजुरीसाठी विकास आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती, तर गुंतवणुकीसाठी सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गुंतवणूक समिती कार्यरत असेल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना (Startup) नव्या संधी उपलब्ध होणार असून, राज्याच्या आयटी क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. तसेच, या उपक्रमामुळे तरुण उद्योजकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community