भारताने Chinaला ‘या’ उद्योगामध्ये टाकले मागे; आता जगभरात भारताचाच बोलबाला सुरु

202

भारत जेव्हापासून आत्मनिर्भर होऊ लागला आहे, तेव्हापासून देशात विविध क्षेत्रात नवनवीन उद्योगांना चालना मिळू लागली आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्र चीनची (China) गोची होऊ लागली आहे. उद्योग क्षेत्रात चीनला भारत स्पर्धक ठरू लागला आहे. विशेष म्हणजे भारताने चीनकडून खेळण्यांची आयात कमी केली आहे. त्यामुळे भारतात खेळण्यांच्या उद्योगाला चालना मिळाली आहे. आता तर भारताची या क्षेत्रातील उलाढाल चीनपेक्षा अधिक झाली आहे.

कोरोना महामारीचा चीनच्या  (China) अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे. भारतीय खेळण्यांची संपूर्ण जगात धूम बघायला मिळत आहे. भारतीय खेळण्यांची निर्यात वाढली असून चीनमधून होणारी आयात 70 टक्क्यांनी घटली आहे. आर्थिक वर्ष 2015 ते 2023 दरम्यान भारतीय खेळण्यांच्या निर्यातीत तब्बल 239 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आयातीत 52 टक्क्यांची घट झाली आहे. महत्वाचे म्हणजे चीनमधून होणाऱ्या खेळण्यांच्या आयातीतही तब्बल 72 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून टॉय मार्केटमधील अथवा खेळणी बाजारातील भारताच्या वाढत्या दबदब्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

(हेही वाचा … तर काँग्रेस श्रीराम मंदिराला ‘बाबरी’ नावाचे कुलूप लावेल; गृहमंत्री Amit Shah यांचा आरोप)

भारत बनला खेळण्यांचा निर्यातदार 

वाढत्या खेळणी उद्योगामुळे भारत आता एक मोठा निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. तर या उद्योगातील चीनचा  (China) दबदबा कमी होताना दिसत आहे. मार्केट रिसर्च फर्म IMARC नुसार, सध्या भारताचा खेळणी उद्योग 1.7 अब्ज डॉलरचा आहे. हा उद्योग 2032 पर्यंत 4.4 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, भारतात खेळणी विकण्यासाठी बीआयएस अप्रूव्हल आवश्यक आहे. तर चीनच्या खेळणी बीआयएस मार्क नसतात. खेळण्यांचा दर्जा बघता, हॅस्ब्रो, मॅटेल, स्पिन मास्टर आणि अर्ली लर्निंग सेंटर भारतातून खेळणी खरेदी करत आहेत. याशिवाय, ड्रीम प्लास्ट, मायक्रोप्लास्ट आणि इंकास, जे पूर्वी चीनकडून खेळणी खरेदी करत होते, ते आता भारताकडे वळवत आहेत. बीआयएस अनिवार्य होण्यापूर्वी, भारतामध्ये 80 टक्के खेळणी चिनी असत. मात्र, आता तसे नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.