Heavy Rain : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

105
Heavy Rain : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

सलग तीन दिवस मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक सखल भाग हे जलमय झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील संपूर्ण पाण्याखाली (Heavy Rain) गेल्याने वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत. अंधेरी सबवे प्रमाणेच मुंबई ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

(हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी, राज्यात चर्चेला उधाण)

समुद्र खवळला

मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ठाणे- पालघर भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. आज म्हणजेच शनिवार २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी समुद्रात भरती येणार आहे. यावेळी साधारण ४.१४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर पाहता अनेक शाळा – कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.