ग्रामीण रस्ते विकास विभागातील भ्रष्टाचार (Corruption) पुन्हा एकचा चव्हाट्यावर आला आहे. (Development of Rural Roads) मंदार रमाकांत पाटील नावाच्या कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवूनही ते रस्ते वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या अभियंत्याने दिल्याची बाब समोर आली आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : पाकिस्तानविरोधात रणनीती तयार?, पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत खलबतं)
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुळचा वरसई (ता. पेण) येथील असलेल्या मंदार रमाकांत पाटील या कंत्राटदाराने रायगड जिल्ह्यातील ५-६ रस्त्यांच्या कामाचे कंत्राट मिळवले होते. त्यामध्ये डोणवत ते ठाकूरवाडी रस्ता (Donwat to Thakurwadi Road), आत्करगाव ते कातकरवाडी रस्ता अशा रस्त्यांच्या कामाचा समावेश होता. ही रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने हिंदू स्वराज्य सेनेचे (Hindu Swarajya Sena) किरण गोविंद शिगवण यांनी त्या विरोधात तक्रार केली होती.
मात्र कंत्राटदाराला करोडो रुपयांचा मलीदा देता यावा यासाठी ग्रामीण रस्ते विकास विभागाने या रस्त्यांची कामे चांगली व वाहतुकीस योग्य असल्याचा अहवाल दिल्याची बाब समोर आली आहे. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या कामाचे (Poor Quality Work) करोडो रुपये कंत्राटदाराला मिळण्याचा मार्ग ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या अभियंत्याने खुला केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि आश्चर्यही आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही ग्रामीण भागातील लोकांना किमान चांगले रस्ते न मिळणे, किमान स्वच्छ पिण्याची पाणी न मिळणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भ्रष्ट सरकारी अधिकारी व अभियंत्यांमुळेच देशाची अशी स्थिती असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. (Corruption)
स्थानिक नागरिकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात पुढे येऊन आपल्या हक्काचा रस्ता मिळवावा यासाठी हिंदू स्वराज्य सेना लोकांना आवाहन करत आहे. (Development of Rural Roads)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community