BMC : मुंबईत आता दुसऱ्या सत्रातील साफसफाई जोरात; तीन वॉर्ड वगळता आता कचरा वाहून नेण्याच्या कामाचे खासगीकरण

4701
MCMCR येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २० मे २०२५ पर्यंत मुदतवाढ
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील कांदिवली, बोरिवली आणि दहिसरसह मुलुंडमधील भागातील कचरा उचलून नेण्याच्या कामाचे खासगीकरण करण्यात आल्यानंतर आता उर्वरीत महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्येही याच धर्तीवर कंत्राटदारांची नेमणूक केली जाणार आहे. कचरा वाहून नेण्यासाठी खासगी वाहनांसह मनुष्यबळही त्यांचे असणार आहे. त्यामुळे यापुढे मुंबईतील कचरा वाहून नेण्याच्या कामांमध्ये मनुष्यबळासह वाहनांची सुविधा घेतली जाणार असल्याने इतर वॉर्डामध्ये कचरा उलण्यासाठी असणारे महापालिकेच्या सफाई कामगारांना दुसऱ्या सत्रांमध्ये सफाईसाठी जुंपवले जाणार आहे. केवळ कुर्ला एल विभाग, मानखुर्द,देवनार एम पूर्व विभाग आणि चेंबूर एम पश्चिम विभागांमध्ये महापालिकेची वाहने आणि महापालिकेचेच सफाई कामगार काम करणार असल्याने या दृष्टीकोनातून कचरा उचलून नेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

मुंबईतील गोळा केलेल्या कचरा हा वाहनांमध्ये जमा करून त्याची विल्हेवाट देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यासाठी यापूवी दिलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्या सन २०१८ मध्ये नवीन कंत्राटदारांची निवड करण्यात आली हाती. महापालिकेने हे काम १४ गटांमध्ये विभागून सुमारे १८०० कोटी रुपयांसाठी कंत्राटदारांची निवड केली होती. यामध्ये कांदिवली आर दक्षिण विभाग, बोरिवली आर मध्य विभाग, दहिसर आर उत्तर विभाग आणि मुलुंड टी विभागासाठी वाहनांसह मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेच्या सफाई कामगारांचा कचरा उचलण्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नव्हता. तर उर्वरीत सर्व ठिकाणी कंत्राट कंपनीची वाहने आणि महापालिकेचा सफाई कामगारांमार्फत कचरा उचलून वाहनात जमा केला जात होता. सात वर्षांसाठी नेमलेले कंत्राट आता संपुष्टात येत असल्याने महापालिकेने यासाठी नव्याने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC)

(हेही वाचा – BSF ने उधळला दहशतवादी कट; हातबॉम्ब, जिंवत काडतुसे आणि पिस्तूल जप्त )

या चार विभाग कार्यालयातील यापूर्वीच्या खासगीकरणाच्या यशस्वी प्रयत्नानंतर आता यापुढे मुंबईतील सर्वच विभागांमधील कचरा उचलण्यासाठीच्या कंत्राट कामांचे खासगीकरण केले जाणार आहे. महापालिकेच्या एल विभाग, एम पूर्व विभाग आणि एम पश्चिम विभाग आदी वगळता उर्वरीत विभागांमध्ये मनुष्यबळासह वाहनांची सेवा खासगी कंत्राटदारांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी चार विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील सफाई कामगारांची संख्या कमी करून त्यांना सफाईच्या कामांसाठी जुंपवल्यानंतर आता नवीन कंत्राट कामांमध्ये मोटर लोडरची संख्या कमी करून त्यांना सफाईच्या कामांसाठी जुंपवले जाणार आहे. तब्बल पाच ते सहा हजार कोटींच्या या कामांसाठीची निविदा राबवण्याची प्रक्रिया सुरु आहे. (BMC)

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी चार विभागांमध्ये जी खासगी कंत्राटदारांकडून कचरा उचलण्यासाठी घेतलेली सेवा यशस्वीपणे पार पडल्याने उर्वरीत विभागांमध्ये मनुष्यबळासह वाहनांची सुविधा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या कंत्राटदारांच्या वाहनांमध्ये महापालिकेचे जे सफाई कामगार कचरा भरण्यासाठी नियुक्त होते, त्यांना आता सफाईच्या कामासाठी जुंपवले जाणार आहे. सध्या पहिल्या सत्रांतच कचरा साफ केला जातो, त्यामुळे वाहनांवरील कामगारांना दुसऱ्या सत्रातील सफाईच्या कामासाठी जुंपवले जाईल. जेणेकरून मुंबईचा परिसर अधिक स्वच्छ आणि सुंदर होईल असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आता कामगारांचा कचरा उचलण्यात कोणताही सहभाग नसल्याने त्यांची मदत सफाई कामासाठी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे कुर्ला एल विभाग, चेंबूर एम पश्चिम विभाग आणि मानखुर्द,देवनार या एम पूर्व विभागांत महापालिकेच्यावतीने कचरा उलचण्यात येणार आहे, यासाठी कंत्राटदारांची मदत घेतली जाणार नाही. याठिकाणी महापालिकेची स्वत:ची वाहने आणि सफाई कामगार त्यावर सेवा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.