Atal Pension Yojana : महिन्याला भरा फक्त २१० रुपये! निवृत्तीनंतर होणार मोठा फायदा

95

देशातील गरजू लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारमार्फत विविध योजना राबवल्या जातात. या योजना राबवण्याचा उद्देश हा या लोकांचे जीवनमान सुधारणे, यांना त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात व गरजू लोकांचे आयुष्य सोयीचे व्हावे यासाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते. आजच्या काळात अनेक लोक म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत परंतु याविषयी सर्वांनाच ज्ञान नसते म्हणूनच तुम्ही भारत सरकारच्या अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. यासंदर्भात माहिती जाणून घ्या…

( हेही वाचा : मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर दरमहा ५ हजार पेन्शन मिळते. या योजनेसाठी अर्जदराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारच्या या योजनेत अनेक नागरिक मोठ्या प्रमाणा गुंतवणूक करत आहेत.

या योजनेचा मूळ उद्देश

  • तुम्ही १८ वर्षांचे असताना तुम्हाला या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवावे लागतील यानंतर जेव्हा तुम्ही ६० वर्षांचे व्हाल तेव्हा त्यानंतर अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा ५ हजार रुपये पेन्शन मिळेल.
  • ६० वर्षांनंतर गुंतवणूकदाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.

असा करा अर्ज

  • या योजनेत तुम्हाला नोंदणी करायची असल्यास, आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, ओळखपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्याही कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • तुमचे आधार कार्ड बॅंकेशी लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे.
  • या योजनेत अर्ज करण्यासाठी htts://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html ला भेट द्यावी लागेल. याठिकाणी तुम्ही APY Application वर क्लिक करून या योजनेत अर्ज करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.