Tomato : टोमॅटोनंतर आता हिरव्या मिरचीने गाठली ‘शंभरी’

81

टोमॅटो पाठोपाठ बाजारात हिरव्या मिरचीचा दर किलोमागे १२० रुपये झाला असून किमान एक ते दोन महिने तरी दिलासा मिळणार नसल्याचे होलसेल बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी पावसाळ्यापूर्वी नवीन पेरणीसाठी शेत साफ करतात आणि या कालावधीत पुरवठ्यात घट दिसून येते.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जून पासून हिरव्या मिरचीचे भाव वाढू लागले आणि आता होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारात, मिरचीची किंमत प्रति किलो ₹ १०० ते ₹ १२० च्या मधे आहे.

साधारणपणे, खरेदीदार हिरवी मिरची आणि कोथिंबीर मोफत घेतात पण आता मिरचीचे दर वाढल्यामुळे ते मिरची मोफत देत नाहीत. वाशी येथील भाजी विक्रेते अमीन पटेल म्हणाले, “हिरवी मिरची मोफत देणे खूप अवघड आहे कारण होलसेल किंमत ₹१०० प्रति किलोच्या पुढे गेली आहे,” ते म्हणाले की हिरवी मिरची नाशवंत आहे आणि त्यामुळे एक किलोची एकूण किंमत ₹१३० पर्यंत जाते.

(हेही वाचा Eknath Shinde : ‘मविआ’तून बाहेर पडलो नसतो तर राज्य 10 ते 15 वर्षे मागे गेले असते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, होलसेल बाजारात हिरवी मिरची प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधून येते. एपीएमसी वाशी येथील एका व्यापाऱ्याने सांगितले की, “एप्रिल आणि मे महिन्यात हिरव्या मिरचीचा तुटवडा असतो कारण शेतकरी ताज्या पेरणीसाठी जमीन स्वच्छ करतात. ते पुढे म्हणाले की, जानेवारीमध्ये खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी ताज्या पेरणीसाठी जुनी झाडे काढण्याचा निर्णय घेतला.

गुजरात आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त, मुंबईलाही पश्चिम बंगालमधून हिरव्या मिरचीचा थोडासा भाग मिळतो. मात्र, तो पुरवठाही कमी झाला आहे. आठवडाभरापूर्वी एपीएमसी वाशी येथे हिरव्या भाज्यांनी भरलेली ४० ते ५० वाहने येत होती. आता, बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांची संख्या १० पर्यंत घसरली आहे. एपीएमसी वाशी येथील व्यापारी वीरेन शहा यांनी सांगितले की, “पुरवठ्यात सुमारे ८०% घट झाली असल्याने, किंमत वाढण्याची शक्यता आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.