धुळे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; १५ जणांचा चिरडून मृत्यू

202
धुळे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; १५ जणांचा चिरडून मृत्यू

समृद्धी महामार्गावरील बस अपघात ताजा असतांनाच धुळे- मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर इंदोरवरून धुळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील पळासनेर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडीचा ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये (सद्गुरू हॉटेल) शिरल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर वीसजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी बाराच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात आतापर्यंत १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – मुंबईत राष्ट्रवादीचं मंत्रालयासमोर नवीन कार्यालय)

प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.