Accident : नागपुरात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू

ही गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेन जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला.

185
Accident : नागपुरात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू
Accident : नागपुरात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये (katol) क्वालिस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असल्याची घटना शुक्रवारी ( १५ डिसेंबर) घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. नागपुरात लग्न समारंभावरून  परतत असताना हा अपघात घडला. (Accident )

मध्यरात्री हा अपघात घडला. ही गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेन जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. लग्न समारंभावरुन परतत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला क्वालीस गाडीची धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे.

(हेही वाचा : Mysore Airport Renamed : विमानतळाला टीपू सुलतानाचे नाव देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरून भाजप आक्रमक)

हा अपघात इतका भीषण होता की क्वालिस गाडीचा चक्काचूर झाला. तर जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि बचावकार्य सुरु झाले. तसेच मृत प्रवाशांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. अजय चिखले (४५),विठ्ठल थोटे( ४५) सुधाकर मानकर (४२) रमेश हेलोंडे ( ४८) मयूर इंगळे ( २६) वैभव चिखले (३२) अशी मृतांची नवे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.