Blood Donation : स्वातंत्र्यदिनानिमित्त सावरकर स्मारकात आयोजित रक्तदान शिबिरात ६५३ युनिट रक्त संकलन 

88

७७व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराचे (Blood Donation) आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते मंगळवारी, १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले. यानंतर दिवसभरात या शिबिरात ६५३ युनिट इतके रक्त संकलन झाले. यंदाच्या रक्तदान शिबिरात टाटा हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल आणि रेल्वेचे जगजीवन राम हॉस्पिटल या चार हॉस्पिटल्सने सहभाग घेतला होता.

मागील तीन वर्षांपासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अल्ट्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात भव्य रक्तदान शिबिराचे (Blood) Donation) आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देशभरातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यासाठी मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया केल्या जातात, केमोथेरॅपी, रेडिएशन थेरेपी केल्या जातात. त्यामुळे वारंवार रक्ताची आवश्यकता भासत असल्याने यंदाच्या वर्षीही देशाच्या स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा Blood Donation : स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिर)

२०२० साली आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्याकडे अशाप्रकारे रक्तदान शिबिर (Blood Donation) घेण्याची संकल्पना मांडली होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्मारकात तुम्हाला मुलबक जागा देतो, अशी ग्वाही दिली. तेव्हापासून आतापर्यंत हे रक्तदानाचे महायज्ञ सुरू आहे. पहिल्या वर्षी ४०० हून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले. दुसऱ्या वर्षी ५००, तर तिसऱ्या वर्षी ६५० हून अधिक पिशव्या रक्तसंकलन केले होते. यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळाला, असे मुंबई अल्ट्राचे नवीन हेगडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना म्हटले.

तर ‘मुंबई अल्ट्रा’चे आनंद काणे म्हणाले, इतक्या दिवस सलग सुट्या आल्या तरी लोक समाधानकारक संख्येने रक्तदान करण्यासाठी आले. आज दिवसभरात ६५३ पिशव्या रक्त संकलन झाले. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अधिक पिशव्या रक्त संकलन झाले.  यंदाच्या वर्षी ऑनलाईन ७०० जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५०० जण आले, तर ३५० जण आगाऊ नोंदणी न करता थेट आले होते. अशा प्रकारे सुमारे १ हजार जण आले परंतु त्यातील २५ टक्के रिजेक्शन झाले. कारण सध्या सर्वत्र तापाची साथ सुरु आहे. लोक यामुळे अँटिबायोटिक खात आहेत, असे अनेक जण होते, ज्यामुळे रक्त दातांची संख्या कमी झाली, असे आनंद काणे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.