उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या बहराइचला दौऱ्यापूर्वी बहराईच जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे ५०० किलो स्फोटके जप्त केली असून या प्रकरणी ७० बंगाली लोकांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे ५०० किलो स्फोटके पकडली गेली आहेत, तर दुसरीकडे ७०० वर्ष जुन्या मजारवर बुलडोझर चालवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १० जून २०२५ रोजी बहराइचच्या दौऱ्यावर असतानाच ही स्फोटके सापडली आहेत.
सर्वेक्षणाच्या नावाखाली पेरली स्फोटके
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बहराइचला (Bahraich) जाणार आहेत; परंतु त्यांच्या दौऱ्यापूर्वीच जिल्ह्यात एक मोठे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सुमारे ५०० किलो स्फोटके जप्त केली असून, या प्रकरणी पश्चिम बंगालच्या (West Bengal) ७० लोकांना अटक करण्यात आली आहे. हरदी भागातील सिकंदरपूर गावाजवळ सुमारे २०० लोक तीन गाड्यांमधून आले. पकडलेल्या लोकांनी स्वतःला तेल कंपनीचे सर्वेक्षण करणारे असल्याचे सांगितले. त्यांनी सुमारे २० किलोमीटरच्या परिसरात जमिनीला छिद्रे पाडून अमोनियम नायट्रेट स्फोटके पेरायला सुरुवात केली. ही स्फोटके बालासराय, लखनापूर, सधुवापूर, सिकंदरपूर आणि औराही यांसारख्या अनेक गावांमध्ये पेरली गेली होती.
ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे खळबळ
रविवार, ८ जून २०२५ या दिवशी जेव्हा गावकऱ्यांना याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्वरित महसीचे आमदार सुरेश्वर सिंह यांना सांगितले. आमदार त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली, परंतु सुरुवातीला कोणीही आले नाही.
जेव्हा ही माहिती मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हा खळबळ उडाली. त्वरित एसडीएम, एसपी आणि इतर मोठे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तिथे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके भरलेली आढळली. आमदार सुरेश्वर सिंह यांनी असाही आरोप केला की, इतकी स्फोटके सापडल्यानंतरही स्थानिक पोलीस अधिकारी गावकऱ्यांवर गाड्या सोडण्यासाठी दबाव आणत होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी स्फोटके मिळणे हे ‘षडयंत्र’ आहे का ?
आमदार सुरेश्वर सिंह यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या ठीक एक दिवस आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके मिळणे, हे कोणत्यातरी मोठ्या षडयंत्राचे प्रतीक आहे. बहराइचचे ग्रामीण एएसपी डीपी तिवारी यांनी सांगितले की, आतापर्यंत ७० लोकांना पकडण्यात आले आहे आणि त्यापैकी बहुतेक पश्चिम बंगालचे आहेत.
दरम्यान, सशस्त्र सीमा बल (Armed Forces, SSB) ने यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला होता की, ३७ लोक नेपाळच्या सीमेतून बहराइचमध्ये घुसखोरी करू शकतात. यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचाही समावेश असू शकतो.
७०० वर्षे जुन्या मजारीवर चालला बुलडोझर
बहराइचमध्ये केवळ स्फोटकेच नाहीत, तर ७०० वर्षे जुन्या लक्कड शाह बाबाच्या मजारवरही बुलडोझर चालवला आहे. या व्यतिरिक्त चमन शाह भंवर शाह आणि शहंशाह बाबांच्या मजारही हटवण्यात आल्या आहेत. ही मजार ७०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा केला जात आहे.
वन विभागाने मजार समितीला यापूर्वीच सांगितले होते की, त्यांना या मजार हटवाव्या लागतील, कारण त्यांच्याकडे जमिनीचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते. ही कारवाई कतरनियाघाट जंगलात झाली आहे. मजार चालवणारे लोक म्हणत होते की, ही जमीन वक्फची आहे (जी धार्मिक कामांसाठी दिली जाते), परंतु ते याचा कोणताही पुरावा दाखवू शकले नाहीत.
लक्कड शाह मजार चालवणाऱ्या समितीचे अध्यक्ष रईस अहमद यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही दर्गा हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक होती आणि येथे बहुतेक हिंदू लोक येत होते.
सरकारचे काय म्हणणे आहे?
प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही कारवाई सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेचा भाग आहे. ते सांगत आहेत की, ही कारवाई कोणत्याही भेदभावाशिवाय केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे सरकार संपूर्ण उत्तर प्रदेशात सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमण हटवण्यावर जोर देत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community