‘आता ठाकरे गटातील उरलेल्या गाळाला चांगले दिवस आले आहेत’, राणेंचा टोला

97

प्रभादेवी येथे शिंदे गट आणि ठाकरे गटात झालेल्या हाणामारीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला इशारा देतानाच दसरा मेळाव्याबाबत देखील भाष्य केले आहे.

दसरा मेळावा खरी शिवसेना असलेल्या शिंदे गटाकडूनच घेण्यात येईल. तसेच पक्षाचं चिन्ह देखील त्यांनाच मिळणार आहे, असे स्पष्ट विधान नारायण राणे यांनी यावेळी केले आहे. तसेच प्रभादेवीतील राड्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केले,यावर देखील नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे.

(हेही वाचाः ‘असे हल्ले करू नका, तुम्हाला महाराष्ट्रात रहायचं आहे’, राणेंचा ठाकरे गटाला थेट इशारा)

राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

या हाणामारीत सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर कौतुक केले. त्यावरुन देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने उठाव केल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटात जो काही गाळ शिल्लक राहिला आहे त्यांना चांगले दिवस आले आहेत. आता त्यांचे मातोश्रीत सत्कार व्हायला लागले आहेत. त्याआधी आमदार,खासदार आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे शिंदे गटाने केलेल्या उठावाची दखल उद्धव ठाकरे यांनी फारच गंभीररित्या घेतलेली दिसतेय, असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.