‘मी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही, पण…’, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

120

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह आणि तथ्यहीन विधान करत आपला खोटारडेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याने भाजपकडून उद्धव ठाकरेंवर देखील टीका करण्यात येत आहे. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

(हेही वाचाः नोटाबंदीचा निर्णय घेण्यामागे शिफारस कोणाची? केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलं उत्तर)

राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही

राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांचा आपमान केला. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आमच्या मनात अतीव प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत जे काही बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल विचारू नये

तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर देखील जोरदार घणाघात केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आमच्या मनात असेलेले प्रेम आणि आदर कोणीही पुसू शकत नाही. मात्र, स्वातंत्र्यवीरांबद्दल भाजपने आम्हाला प्रश्न विचारू नयेत. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तीन-चार हात लांब होते त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलू नये. त्यामुळे हा पाचकळपणा त्यांनी बंद करावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.