पाकिस्तानसुद्धा सांगेल शिवसेना कुणाची; निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल 

तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो, आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

202

सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची?  हे दिसतयं!  पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय तो त्यांचा प्रश्न. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बघतोय. काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अश्या अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या. आज खरच तात्यांची उणीव भासते, ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे जाहीर सभेत केला.

त्यांना मारायला तोफेची गरज नाही 

मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ. निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच. अंबादास यांनी व्यथा मांडल्या शेतकऱ्यांच्या. आपले सरकार होत तेव्हा कोरोनाचे जागतिक संकट. नैसर्गिक संकटात आपण सरकार असतांना मदत केली. आता सरकारच अवकाळी, यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार. पोलिसांना आवाहन आहे शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. बहिणाबाई जर आज असत्या तर त्यांना पण या सरकारने तुरूंगात टाकले असते. बहिणाबाईंच्या कवितेच्या ओव्या आठवा. आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही. काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात. तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत त्यांना मारायला तोफ नको. आज माझ्याकडे काही नाही पण तुम्ही आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत त्यांनी येऊन दाखवावे, असेही ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा Exclusive# अजित पवार केवळ मोहरा; खरी फूट कॉंग्रेसमध्ये पडणार!)

निवडणूक आली की अबकी बार आता यांना आपटा

भाजप हे आव्हान नाही, पण ते सत्तेवर आहेत त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे. दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी पहिली. २६ वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो. लोकसंख्येचे देशात अमाप पीक पण तरुण मुले आत्महत्या करत आहेत. राजा निवडायचा हक्क तुमचा आहे. पण तुमच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी महागाई वर बोलायचे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल असेल तर हात वर करुन सांगा. निवडणुक आली की अबकी बार आता यांना आपटा, असे ठरवा. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले. काश्मीरबद्दल बोलले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली. पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणूक प्रचारात कर्नाटकात. मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले. काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. यांना भारत मातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुत्व सोडले नाही 

आज माझ्याकडे पक्षाचे नाव, चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय, शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत. आपल्या लोकांना बाहेर कसे जातील हे भाजप प्रयत्न करते आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात. संजय राऊतांचे कौतुक वाटते तो त्रास दिला तरी भाजपात गेला नाही. नितिन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक जे माझ्या सोबत त्यांची छळवणूक ईडी सीबीआय करत आहे. या एकदाचे जेल भराच, आव्हाने कसले देता नामर्दपणा करताय का? राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे. मिंधे सरकारने काय दिलय? मी घरीबसून जे सरकार चालवल ते तुम्ही वणवण फिरुन पण तुम्ही करु शकत नाही. घराणेशाहीत पण एक परंपरा असते. तीन वर्षात एकतरी प्रसंग मला सांगा की मी हिंदुत्व सोडले. मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली. सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली. मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे हिंदुत्व काय समजतच नाही. एका राज्यात गोहत्याबंदी एका राज्यात नाही. उलट लोकांना चिरडतायत हे आमचे हिंदुत्व नाही. ठाण्याचा रोशनी शिंदे हल्ला झाला हे असले यांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व नाही. रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले त्यांची तक्रार घेतली नाही. भाजपला आव्हान त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात निवडणूक लढणार आहेत का? तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.