Uddhav Thackeray : सरकार आपल्या दारी आणि घोषणा केवळ कागदावर – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत, त्यांच्याकडे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी मला वाईट वाटत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

124

सरकार आपल्या दारी थापा मारत आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवत आहे. डबल आणि ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करत आहे? सरकार आपल्या दारी आणि घोषणा केवळ कागदावर अशी परिस्थिती आहे, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा –

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ज्या गद्दाराला आपण नाग समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार केला. उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून एकनाथ शिंदे गटाचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे. मी गद्दारावर वेळ घालवणार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर हल्लाबोल केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी येण्यासाठी गाड्या लावाव्या लागत नाही. काही जण हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग व्हावी म्हणून काढणारे आमदार आहेत. माझी सभा ही जनतेसाठी आहे, गद्दारांसाठी नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शंभू महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. संतोष बांगरांचा उद्धटपणा चिरडून टाकावा लागेल.

(हेही वाचा Khalistan Slogans In Delhi : खलिस्तानी दहशतवादी पोहोचले दिल्लीत)

भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत, त्यांच्याकडे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी मला वाईट वाटत आहे. संतरज्या घालण्यासाठी भाजपचे जुने कार्यकर्ते काम करताय आणि बाहेरचे येऊन सत्ता उपभोगत आहेत. भाजपला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. दिल्लीतील वडीलांमध्ये मत मागायची ताकद नाही का. ही केवळ नामर्दपणा आहे. एनडीए हे घमेंडी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.