PM Narendra Modi : घरोघरी जाऊन माझा नमस्कार सांगा; पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय अधिवेशनात भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन

190
आज 18 फेब्रुवारी आहे आणि या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18व्या लोकसभेसाठी निवडून येणार आहेत. पुढील 100 दिवस आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्याला सर्वांचा विश्वास संपादन करावा लागेल. सर्वांचे प्रयत्न होतील तेव्हा भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून देशसेवा होईल. त्यासाठी घरोघरी जाऊन माझा नमस्कार सांगा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  याची भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केले.

शतकानुशतके प्रलंबित कामे पूर्ण केली 

मिशन शक्ती देशात महिला सक्षमीकरणाचे वातावरण निर्माण करेल. पारंपरिक कलांशी संबंधित भगिनींना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सक्षम केले जाईल. गावाजवळ खेळाच्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर मुली खेळात चमत्कार घडवतील. गेली 10 वर्षे धाडसी निर्णयांची आणि दूरगामी परिणामांची वर्षे आहेत. शतकानुशतके प्रलंबित असलेले काम पूर्ण झाली आहेत. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर बांधले. सात दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम ३७० मधून स्वातंत्र्य मिळाले. चार दशकांनंतर आपल्याला वन रँक वन पेन्शनची भेट मिळाली आहे. तीन दशकांनंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळाले आहे. अनेक दशकांपासून संसदेच्या नव्या इमारतीची गरज होती आणि ती आम्ही पूर्ण केली, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

स्वप्न आणि संकल्पही मोठे असतील

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारताने आज प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली आहे, त्यामुळे प्रत्येक देशवासीय मोठ्या संकल्पाने एकत्र आले आहेत. हा विकसित भारताचा संकल्प आहे. आता देश ना छोटी स्वप्ने पाहू शकतो ना छोटे संकल्प करू शकतो. आपली स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही मोठे असतील. भारताचा विकास करायचा हे आमचे स्वप्न आणि संकल्प आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

आम्ही राजकारण नाही तर राष्ट्रीय धोरण करायला आलो आहोत

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘अनेक लोक आम्हाला सांगतात की खूप काम झाले आहे, आता थोडी विश्रांती घ्या, परंतु आम्ही त्यांना सांगतो की आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर राष्ट्रीय धोरण करण्यासाठी आलो आहोत. योजना कशा पूर्ण करायच्या हे आपल्या विरोधी पक्षांना माहीत नसेल, पण खोटी आश्वासने देण्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे सर्व राजकीय पक्ष आश्वासने द्यायला घाबरत आहेत. हेच विकसित भारताचे वचन आहे आणि हेच आमचे वचन आहे. केवळ भाजप आणि एनडीए आघाडीने याचे स्वप्न पाहिले आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.