Udhayanidhi Stalin : विधवा असल्यामुळेच राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नाही; उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ पुन्हा घसरली

113
Udhayanidhi Stalin : विधवा असल्यामुळेच राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नाही; उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ पुन्हा घसरली
Udhayanidhi Stalin : विधवा असल्यामुळेच राष्ट्रपतींना संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नाही; उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ पुन्हा घसरली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले नाही, कारण त्या विधवा आहे आणि आदिवासी समाजातील आहेत. (Udhayanidhi Stalin) यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का ?, असा प्रश्न उपस्थित करून तमिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी २० सप्टेंबर रोजी मदुराई येथील एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा सनातन धर्म आणि अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर टीका केली आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या विषयावर बोलतांना उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ घसरली.

(हेही वाचा – Revenue Depatment : बदलीनंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दणका)

उदयनिधी स्टॅलिन पुढे म्हणाले, ” सुमारे 800 कोटी रुपये खर्चून बांधलेले नवे संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. तरीही भारताच्या प्रथम नागरिक असूनही देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यांची आदिवासी पार्श्वभूमी आणि त्या विधवा असल्याने त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. तसेच, आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. विरोधात आम्ही आवाज उठवत राहू.” (Udhayanidhi Stalin)

संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले गेले, तेव्हाही हिंदी अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले होते, मग देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का आमंत्रित करण्यात आलेले नव्हते ? राष्ट्रपतींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे बाहेर ठेवण्यात आले होते. या घटना म्हणजे अशा निर्णयांवर ‘सनातन धर्मा’चा प्रभाव असल्याचे द्योतकच आहेत, असा आरोपही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे. (Udhayanidhi Stalin)

सनातनला संपवण्याचे ध्येय साध्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

उदयनिधी यांनी ‘सनातन धर्मा’वर केलेल्या सुरुवातीच्या टीकेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भातही वक्तव्य केले. ते म्हणाले की, लोकांनी माझ्या डोक्याची किंमत ठरवून दिली आहे. मी अशा गोष्टींबद्दल कधीही काळजी करणार नाही. द्रमुकची स्थापना सनातनला संपवण्याच्या तत्त्वांवर झाली. आमचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

सनातन धर्माबाबत काय म्हणालेले उदयनिधी स्टॅलिन

“काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना नष्टच केले पाहिजे. आपण डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही, तर त्याला नष्टच करायचे असते. त्याचप्रकारे सनातनदेखील नष्ट केले पाहिजे; कारण सनातन धर्म हा समाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे, अशीही गरळओक त्यांनी केली होती. त्यांच्या या विधानाला मोठा विरोध झाला होता. (Udhayanidhi Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.