PM Modi On Sanatan Dharma Defamation : योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज; उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीवर पंतप्रधानांचे मत

119
PM Modi On Sanatan Dharma Defamation : योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज; उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीवर पंतप्रधानांचे मत
PM Modi On Sanatan Dharma Defamation : योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज; उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीवर पंतप्रधानांचे मत

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मत मांडले आहे. याविषयी ‘योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज आहे’, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडले. (PM Modi On Sanatan Dharma Defamation)

 (हेही वाचा – One Nation One Election : ‘एक देश एक निवडणुकी’ला तीन वर्षे लागतील)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून  ‘सनातन धर्माविषयीच्या वक्तव्याला मंत्र्यांनी समर्पक उत्तर द्यावे आणि विरोधकांचा सामना करण्यासाठी तथ्यांचा वापर करावा’, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे केलेल्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नेते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करून सनातन धर्माच्या अवमानाचा निषेध केला आहे. ‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. ६ सप्टेंबर या दिवशी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दोन वकिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. (PM Modi On Sanatan Dharma Defamation)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अमित शाह म्हणाले होते की, ”भारतीय आघाडीतील २ प्रमुख पक्ष काँग्रेस आणि द्रमुक सनातन धर्म संपुष्टात आणला पाहिजे, असे म्हणत आहेत. वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी या लोकांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. ते म्हणतात की, मोदी जिंकले, तर सनातन राज येईल. सनातन लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की देश संविधानाने चालेल. राहुल गांधी म्हणाले होते की, हिंदू संघटना लष्कर-ए-तैयबापेक्षाही धोकादायक आहेत. राहुल बाबा, तुम्ही हिंदू संघटनेची तुलना लष्कर-ए-तोयबाशी करत आहात, तर तुमचे गृहमंत्री म्हणायचे की हिंदू दहशतवाद सुरू आहे. वोट बँकेचे राजकारण करण्यासाठी ‘इंडिया’ युती कोणत्याही थराला जाऊ शकते.”

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही या विषयी जोरदार हल्लाबोल चढवत  ‘इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या द्रमुकने ‘सनातन धर्म’ संपवण्याची घोषणा केली. आम्ही सनातन धर्म संपुष्टात येऊ देणार का ? आम्ही हिंदू धर्मावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ देणार का ?’, असे प्रतिप्रश्न उपस्थित केले होते. (PM Modi On Sanatan Dharma Defamation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.