Nitesh Rane: धारावीच्या नव्हे तर मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, नीतेश राणे यांचा ठाकरे गटावर घणाघात

शनिवारी निघालेला 'धारावी बचाव' मोर्चा नव्हता, तर 'मातोश्री' बचाव मोर्चा होता, असा हल्लाबोलही नीतेश राणे यांनी केला आहे. 

112
Nitesh Rane: धारावीच्या नव्हे तर मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, नीतेश राणे यांचा ठाकरे गटावर घणाघात
Nitesh Rane: धारावीच्या नव्हे तर मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, नीतेश राणे यांचा ठाकरे गटावर घणाघात

सुषमा अंधारे या सुषमा फर्निचरवाले असल्याची टीका (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केली आहे. शनिवारी निघालेला ‘धारावी बचाव’ मोर्चा नव्हता, तर ‘मातोश्री’ बचाव मोर्चा होता, असा हल्लाबोलही नीतेश राणे यांनी केला आहे.

(हेही वाचा- Sajjan Jindal या उद्योगपतिविरुद्ध अभिनेत्रीकडून बलात्कारची तक्रार दाखल )

नीतेश राणे सुषमा अंधारेंवर टीका करताना म्हणाले की, मुंबई कॉंग्रेसची नेतेमंडळी माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसली होती. त्यांची धारावीमध्ये निघालेल्या मोर्चासंदर्भात चर्चा सुरू होती आणि एक वाक्य एका कॉंग्रेस नेत्याने उच्चारलं ते म्हणजे, धारावीच्या मोर्चाचं विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने करतं. त्याने आजूबाजूच्या नेत्यांना विचारलं, उद्धवजी मोर्चा क्यू निकाल रहे है ? बंगलेपे अभी तक फोन आया नही क्या? फोन आ जाता तो फीर सेटलमेंट हो जाती? या एका चर्चेमध्ये कालचा निघालेला धारावी बचाव मोर्चा नव्हता पण मातोश्री बचाव मोर्चा होता. तो काल धारावीच्या निमित्ताने निघालेला होता.

असे म्हणत असताना ते पुढे म्हणाले की, संपूर्ण आयुष्य ज्या उद्धव ठाकरेने दलालीवरच काढलं त्याचं उत्पन्न कुठे आहे ते महाराष्ट्रातलं कोणीही अजूनपर्यंत सांगू शकत नाही. त्यांच कुटुंबं कुठून कमवतं. दुसऱ्यांवर दलाली आणि बूट चाटण्याचे आरोप करतो हे जगातलं फोर मोठं आश्चर्य आहे, असा हल्लाबोलही यावेळी नीतेश राणे यांनी यावेळी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.