Anna Hazare : अण्णा हजारे देणार आव्हाडांना दणका

'टोपी घालणे म्हणजे गांधी असणे नव्हे'; अण्णा हजारे यांच्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

97
Anna Hazare : अण्णा हजारे देणार आव्हाडांना दणका

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यावर एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘या माणसाने या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही.”

आव्हाड यांच्या या ट्विटमुळे अण्णा हजारे (Anna Hazare) चिडले असून त्यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलतांना अण्णा हजारे म्हणाले की; ” संपूर्ण जगाला माहित आहे की अण्णा हजारे (Anna Hazare) कोण आहेत, हे मला सांगण्याची गरज नाही. मी वकिलाकडून सूचना घेत आहे आणि प्रतिष्ठेला इजा झाल्याबद्दल अब्रुनुकसानी अंतर्गत खटला दाखल करणार आहे.”

(हेही वाचा – MLA Disqualification Case : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर)

अण्णा हजारे (Anna Hazare) पुढे म्हणाले, “जर माझ्यामुळे देशाचे नुकसान झाले आहे, तर मी असे अनेक कायदे केले आहेत ज्यांचा देशातील लोकांना फायदा झाला आहे. माझ्या काही हालचालींमुळे, त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) काही कामगारांचे नुकसान झाले, हे आपण नाकारू शकत नाही. त्यांच्या अनेक कामगारांना माझ्यामुळे घरी जावे लागले, हे त्यांच्यासाठी निश्चितच एक नुकसान होते आणि ते कदाचित ते सहन करू शकत नाहीत. त्यामुळे काही खोटे आरोप करणे आणि माझी बदनामी (Anna Hazare) करणे हे त्यांचे काम आहे, परंतु याचा मला काही फरक पडत नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.