राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह? औरंगाबादेत १३ दिवस जमावबंदी

97

येत्या 1 मे रोजी औरंगबाद येथे मनसेकडून भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला पाच दिवस बाकी असताना अद्याप औरंगाबाद पोलिसांनी या सभेसाठी मनसेला परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आता औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कधीपर्यंत असणार जमावबंदीचे आदेश?

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार आहे. विविध सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या या जमावबंदीच्या आदेशानुसार, 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी असणार आहे. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. आता या आदेशामुळे राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा- राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)

राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित

मनसेकडून 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवर हा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरसोबत ‘चला संभाजीनगर’ असे कॅप्शनदेखील देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.