Raj Thackeray : जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; राज ठाकरे म्हणाले, ‘मराठा समाजातील तरुण अस्वस्थ…’

153

मराठा समाजाला आरक्षण देण्यात देण्यात यावे, या मागणीसाठी मागील १७ दिवस मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणावर बसले होते, अखेर गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगे पाटील यांना भेटायला उपोषणस्थळी गेले, त्यानंतर जरांगे पाटील यांनी आश्वासन सोडले, त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत, समाधान व्यक्त केले.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काय केले ट्विट? 

मनोज जरांगे पाटील ह्यांचे मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होते ते त्यांनी मागे घेतले, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो. आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो, असे राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा Manoj Jarange Patil : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.