५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले?; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल

102
मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? याची चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्यावर आवश्यक असेल तर चौकशी करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.
विधानसभेत मंगळवारी मुंबईतील अंधेरी पूर्वच्या पुलाच्या कामाबद्दल लक्षवेधी सूचना भाजपा आमदार सुनील राणे यांनी मांडली होती. यावर बोलताना शेलार यांनी मुंबईतील डांबरी रस्त्याच्या विषयाकडे लक्ष वेधले. या प्रकरणी आपल्या भाषणात टीका करणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या संशयाचे जोरदार खंडन आशिष शेलार यांनी केले. हा पुल धोकादायक झाला, असे प्रशासन सांगते तेव्हा त्याची पुनर्बांधणी करा, अशी मागणी करणारे पत्र स्थानिक आमदार म्हणून अमित साटम यांनी दिले असेल, तर त्याची कसली चौकशी करणार? असा सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी चौकशीच करायची असेल तर गेल्या २५ वर्षांत झालेल्या डांबरी रस्त्यांमध्ये आणि पुलांच्या डांबरीकरणाची चौकशी करा.  मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? कोल्ड मिक्स आणि हाॅट मिक्स याची चौकशी करा अशी आग्रही मागणी केली.

चौकशी करू – फडणवीस

दरम्यान, याची तातडीने दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी वस्तुस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असेल तर चौकशी करण्यात येईल. सरकार कुणालाही टार्गेट करणार नाही, तसेच कुणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.