Maharashtra Politics : राष्ट्रवादी नव्हे, काँग्रेस फुटणार; १६ आमदार भाजपाच्या संपर्कात

काँग्रेसमधील १६ आमदारांचा गट भाजपमध्ये येण्यासाठी राजी झाला आहे. त्याचे नेतृत्व खुद्द अशोक चव्हाण करत असून त्याकडे लक्ष जाऊ नये, यासाठी अजित पवारांविषयी चर्चाना बळ दिले जात आहे.

188
राष्ट्रवादी नव्हे, काँग्रेस फुटणार; १६ आमदार भाजपाच्या संपर्कात
राष्ट्रवादी नव्हे, काँग्रेस फुटणार; १६ आमदार भाजपाच्या संपर्कात

प्रतिनिधी – सुहास शेलार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ४० आमदारासह भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याचे राजकारण Maharashtra Politics ढवळून निघाले आहे. शहरापासून गावापर्यंत चौकाचौकांत, पायांवर गल्लीबोळात राष्ट्रवादीतील फुटीविषयीच्या चर्चा चवीचवीने चघळल्या जात आहेत. परंतु, या चर्चा केवळ लक्ष विचलित करण्यासाठी असून, फूट काँग्रेसमध्ये पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘हिंदुस्थान पोस्ट ला दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील त्यानंतर अजित पवार ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अशा चर्चा गेल्या दिवसापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे पक्षातील मंत्री आमदार त्यास दुजोरा देत आहेत. राष्ट्रवादीचे दोन-दोन आमदार तर गुडग्याला बाशिंग बांधून तयारी आहेत. त्यामुळे उद्विग्न झालेल्या अजित पवारांनी नुकतीच माध्यमांसमोर सफाई दिली, तरीही चर्चा थांबायला तयार नाही. त्यामुळे “हिंदुस्थान पोस्ट भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात याचा कानोसा घेतला असता खळबळजनक माहिती समोर आली. त्यानुसार अंजीर पवारांच्या नावे जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात असून, या आडून पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरु आहेत, काँग्रेसमधील १६ आमदारांचा गट भाजपमध्ये येण्यासाठी राजी झाला आहे. त्याचे नेतृत्व खुद्द अशोक चव्हाण करत असून त्याकडे लक्ष जाऊ नये, यासाठी अजित पवारांविषयी चर्चाना बळ दिले जात आहे.

(हेही वाचा Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस विकासामधील अडथळा)

ठाकरेंकडून पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार यांच्याविषयी सातत्याने उलट-सुलट चर्चा होत असल्यामुळे निवडणुकाच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या Maharashtra Politics भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल मागे घेतले असून, त्यांनी थेट अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे कळते. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्यात कोणाला कितीही जागा मिळाल्या, तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, असे आश्वासन ठाकरेंनी शरद पवारांना दिल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसमधील काही आमदार भाजपामध्ये येण्यासाठी अनुकूल आहेत. त्याविषयीच्या चर्चा अंतिम टप्यात आल्या आहेत. यात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विश्वजीत कदम, धीरज देशमुख, अमर राजूरकर, संग्राम थोपटे यांच्यासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांचा समावेश आहे. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवसेना एकत्र लढली, तर लोकसभेला शिवसेना-भाजपा युतीला 30 हून अधिक जागा मिळणार नाहीत. शिवाय एकट्या शिव्या भरवशावर विधानसभेला पूर्ण बहुमत मिळणे आजमितीला तरी शक्य नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीला Maharashtra Politics सुरूंग लावत कॉंग्रेसमधील एक गट फोडला, तर विधानसभा, लोकसभेसह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या होतील अशी रणनीती भाजपाकडून आखली जात आहे.

फूट कधी पंडणार ?

सध्या कॉंग्रेसकडे ४४ आमदारांचे बळ आहे. त्यातील १६ जणाचा गट फुटला, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कारवाई होऊ शकते. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी इतक्यात हे पक्षप्रवेश होणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भगदाड पाडले. जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.