Lok Sabha Election 2024 : भारत जोडो न्याय यात्रेमुळे ‘वंचित’वर निर्णय होत नाही…

महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून वंचितला सोबत घेण्यासंदर्भात जरी आग्रह असला तरी जागा वाटपांबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडे या यात्रेच्या तयारीमुळे वेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

89
Vanchit Bahujan Aghadi च्या उमेदवाऱ्या महायुतीच्या पथ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप येत्या १७ मार्चला मुंबईत होत आहे. यानिमित्ताने काँग्रेस मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार असून या सभेतून काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेला इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात युवराजांचे होणारे आगमन आणि त्यासाठी होत असलेल्या तयारीसाठी काँग्रेसचे बडे नेते या व्यवस्थापनात लागल्यामुळे वंचित आघाडीचे नक्की करायचे काय? त्यांना किती जागा द्यायच्या यावर अजूनही निर्णय घेण्यासाठी वेळ नसल्याचे समोर येत आहे. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्रात नंदुरबार ते मुंबई असा युवराजांचा दौरा होणार आहे. याच्या तयारीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठका घेण्यात व्यस्त असल्यामुळेच वंचित बाबतचा कोणताही निर्णय घेण्यासाठी वेळ नसल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून वंचितला सोबत घेण्यासंदर्भात जरी आग्रह असला तरी जागा वाटपांबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडे या यात्रेच्या तयारीमुळे वेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याच कारणाने महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते काँग्रेसच्या या भूमिकेमुळे काहीसे नाराज देखील असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : यशस्वी जयस्वालने मोडला विराटचा ‘हा’ विक्रम)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि १७ मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार असून या सभेला इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) नेते उपस्थित असतील. या सभेत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.