गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका! फडणवीसांचे सरकारला पत्र 

96

सध्या राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. यासंबंधीचे पत्र फडणवीस यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही पाठवले आहे.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!

गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी, ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिले पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

(हेही वाचा मालेगाव दंगल : अटक सत्र सुरूच, नुकसानीच्या वसुलीचा प्रस्तावही तयार)

तर सरकार असेल जबाबदार!

त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आमदार गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्यावी, गोपीचंद पडळकर यांच्या जिवास काही बरे वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. याआधी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता. तर सांगलीतही पडळकरांच्या गाडीवर तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ला झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.