कोल्हापूर कनेक्शन ते उद्धव ठाकरे; काय म्हणाले नितेश राणे?

207
कोल्हापूर कनेक्शन ते उद्धव ठाकरे; काय म्हणाले नितेश राणे?
कोल्हापूर कनेक्शन ते उद्धव ठाकरे; काय म्हणाले नितेश राणे?

कोल्हापूरात बुधवारी ६ जून रोजी हिंदूत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. जमावबंदी असूनही काढलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लाभले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड प्रमाणात झटापट झाली. काही जिहादी जमावाने औरंजेबाचे आणि टिपू सुलतानाचे फोटो दाखवले. घडलेल्या या प्रकाराबद्दल संबंधित ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या या सर्व प्रकाराबद्दल नितेश राणेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून काही खळबळजनक आरोप केले आहेत.

‘काही महिन्यांपूर्वी संजय राऊत म्हणाले होते महाराष्ट्रात दंगल होणार’

बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, औंरगजेब आणि टिपू सुलतानावरचे प्रेम जास्त उफाळून येत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सोय आमच्याकडे आहे. ज्या औंरगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तर त्याच औंरगजेबाच्या फोटोच्या बाजूला फोटो लावण्याची सोय आम्ही करु. काल संगमनेर, बुधवारी कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. काल संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा शांतपणे जात असता जिहादी विचारांच्या जमावानी त्यांच्यावर दगडफेक केली. कोल्हापूरमध्येही बुधवारी सकाळपासून हिंदूत्ववादी विचारांचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत मी त्यांचे समर्थन करतो. अशा पद्धतीचे औरंगजेबावरचे प्रेम हे अचानक आलेले नाही. जसा देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी उल्लेख केला, तर काही दिवसांअगोदर कॉंग्रेसचा एक नेता दंगलीबद्दल बोलतो, आणि लगेच काही दिवसांनंतर औरंगजेबाचा फोटो स्टेट्सवर ठेवला जातो. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्रामध्ये दंगल होणार असे किंचाळतोय आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरु झालेल्या आहेत.

(हेही वाचा – औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार; निलेश राणेंची जहरी टीका)

औरंगजेबावरचे प्रेम नक्की कोणाचे?, नितेश राणेंचा सवाल

पुढे नितेश राणे म्हणाले की, औरंगजेबाचे जे थडगे आहे त्याचे सुशोभिकरण नेमके कोणी केले? संजय राऊतांच्या मालकाच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात झाले होते तर मग औरंगजेबावरचे प्रेम नक्की कोणाचे आहे? म्हणून परत परत अशा पद्धतीने हिंदू समाजाला डिवचण्याचे काम जो कोणी करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. आमचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली चालले आहे. हे दोघेही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, ज्या औरंगजेबाच्या विरोधात शिवरायांनी संघर्ष केला, त्या औरंगजेबाची एकही आठवण किंवा कोणी औरंगजेबावर प्रेम करत असेल तर त्याला काही आम्ही या महाराष्ट्रामध्ये ठेवणार नाही.

राज्यात औरंगजेबवरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.