Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ वर त्वरित कायदा करा – किरीट सोमय्या

भांडुप येथून मुलीला पळवणारा, तिच्याशी प्रेमाचे नाटक करणारा सैफ खान हा फक्त १९ वर्षांचा आहे. १९ वर्षांचा मुलगा एकटा अशा प्रकारचे धाडस करू शकत नाही, अशी स्पष्टता भाजपचे किरीट सोमैया यांनी केली आहे.

139

१३ वर्षांच्या हिंदू मुलीचे सैफ खान आणि मोहम्मद यांनी अपहरण केले. भांडूप येथील हे लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहे. १३ वर्ष ८ महिन्यांची आपली मुलगी सापडत नाही अशा प्रकारची तक्रार बडेला यांनी ८ मे रोजी केली. पीडित यांच्या घराजवळ हेअर कटिंग सलूनमध्ये काम करणारे सैफ खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद यांनी या मुलीला फसवले असल्याचे आता समोर आले आहे. या मुलीला फसवून तिला जबरदस्तीने आझमगडला नेण्यात आले, आझमगडच्या एका छोट्याशा गावात बंद खोलीत तिला कोंडून ठेवण्यात आले. मुलीचा मोबाईल ही तिच्याकडून काढून घेतला. ५ दिवस या मुलीची छेडछाड करण्यात आली, शारीरिक खेळ करण्यात आला, असा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने दुसऱ्या कोणाच्या मोबाईल वरून आपल्या वडिलांना कळविले की तिला कुठे तरी कोंडून ठेवण्यात आले आहे. या फोन कॉलचा पाठपुरावा, ट्रेस करताना मुंबई पोलीस आझमगड येथे पोहचले. ५ दिवसांनी या मुलीला ताब्यात घेण्यात आले आणि मुंबईत आणण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित लव्ह जिहाद वर कायदा करावा, अशी मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

या मुलीला पळवणारा, तिच्याशी प्रेमाचे नाटक करणारा सैफ खान हा फक्त १९ वर्षांचा आहे. १९ वर्षांचा मुलगा एकटा अशा प्रकारचे धाडस करू शकत नाही, अशी स्पष्टता भाजपचे किरीट सोमैया यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलीची मुलीच्या वडिलांची व भांडूपच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सामान्य प्रकरण म्हणून घेतले त्याची तीव्र टिका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमैया यांनी चर्चा केल्यानंतर आता हे प्रकरण मुंबई पोलीसचे सह आयुक्त सत्यनारायण हाताळत आहेत. या मुलीला पळवण्यात आले, या मुलीचे अपहरण करण्यात आले, ५ दिवस छोट्याशा गावात बंद खोलीत कोंडण्यात आले आणि या प्रकरणात सैफ आणि मोहम्मद यांना त्यांच्या परिवाराच्या आणखीन ५ लोकांनी मदत केली. हे प्रकरण लव्ह जिहादच आहे म्हणून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. सैफ आणि मोहम्मद सह त्यांना मदत करणाऱ्या ५ लोकांना ताबडतोब पोलिसांनी अटक करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. काल संबंधित न्यायालयात मुलीचा जबाब, स्टेटमेट ही झाले आहे. मुलीचे वडील आणि मुलीने हे स्पष्टपणे सांगितले आहे कि मुलीची शारीरीक छेडछाड करण्यात आली होती, मुलीला फसवण्यात आले होते, तिचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. सुदैवाने ज्या परिवारात कोंडून ठेवण्यात आले होते त्याच घरातील एक मोबाईल काही सेकंदासाठी तिच्या हातात आला आणि तिने वडिलांना कळवले. ह्या जर मुलीला मोबाईलवरुन वडिलांना निरोप देता आला नसता तर या १३ वर्षाच्या हिंदू मुलीचे काय झाले असते. लव्ह जिहादमधील या प्रकरणावर कडक कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली आहे. लव्ह जिहाद संबंधात ताबडतोब कायदा आणावा असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

(हेही वाचा मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले मंत्री; काय जादू झाली? वाचा सविस्तर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.