Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील म्हणाले…

203
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील म्हणाले...
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील म्हणाले...

कोणी काही म्हणो मीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ‘शरद पवार जोपर्यंत बाजूला हो म्हणत नाहीत. तोपर्यंत बाजूला करण्याचा कोणाला अधिकार नाही’, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ‘नऊ जण सोडले तर इतर सगळेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत’, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या निर्णयाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(हेही वाचा – BJP : भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले)

आमदारांना संकटात न टाकण्याचे आवाहन

जयंत पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमचा आहे. सगळेच ५३ आमदार आमच्याकडे होते. त्यातील ९ जणांवर कारवाई केली आहे. ५३ पैकी ९ सोडून बाकीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. त्यामुळे आमदारांना संकटात टाकू नये. त्यांना प्रलोभने दाखवून दबाव टाकू नये. सर्वांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करून द्यावे, असं आवाहन करतो.’

न्यायालयात जाण्याची गरज नाही!

न्यायालयात जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी सांगितले आहे की, ‘न्यायालयात जाण्याची गरज नाही. आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्रातील जनता पूर्णपणे आमच्या पाठीमागे असेल, तर कसल्याही भीतीचे कारण नाही.’

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.