Election Commission : जनतेला ‘विकास भारत’ संदेश पाठवणे त्वरित थांबवा; केंद्रीय निवडणूक आयोगाचा केंद्र सरकारला आदेश

127

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊनही आचारसंहिता लागू असतानाही सरकारच्या योजनांची माहिती देणारे ‘विकास भारत’ नावाने संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. याविषयीची तक्रार आयोगाकडे आली, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) गुरुवारी, 21 मार्च रोजी तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (IT ministry) व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे ‘विकास भारत’ संदेश त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश 

मंत्रालयाने आयोगाला यासंबंधी खुलासा केला आहे. त्यात म्हटले होते की, हे संदेश आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले होते, परंतु सिस्टम आणि नेटवर्क समस्यांमुळे ते उशिरा पोहोचले. यापूर्वी आयोगाने  (Election Commission) गुजरात, पंजाब, ओडिशा आणि आसाम या चार राज्यांमध्ये नॉन-कॅडर अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. यामध्ये 8 जिल्हाधिकारी आणि 8 एसपींचा समावेश आहे. आसाममध्ये सीएम हिमंता बिस्वा सरमा यांचे भाऊ सोनितपूरचे एसपी सुशांत बिस्वा सरमा आणि पंजाबमध्ये खादूर साहिबमधील काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांचे भाऊ भटिंडा हर्ननबीर सिंग गिल यांना हटवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींविरोधात आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने  (Election Commission)  16 मार्च रोजी 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 21 राज्यांतील 102 जागांसाठी मतदान होणार आहे.

(हेही वाचा Baramati Lok sabha constituency : शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट; थोपटे म्हणाले, अजून भूमिका घेतली नाही; दोन्ही पवारांची धाकधुकी वाढली…)

पंतप्रधान मोदींच्या विरोधात तक्रार 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या उल्लंघनाच्या तक्रारीही दाखल होऊ लागल्या आहेत. पंतप्रधान मोदींविरोधात 24 तासांत दोन तक्रारी आयोगाकडे  (Election Commission) पोहोचल्या आहेत.

• 18 मार्च – TMC नेते डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगाला तक्रार पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे, पंतप्रधान मोदींनी 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू केल्यानंतर विकास भारत संकल्प यात्रेचा व्हॉट्सअॅप मेसेज देशवासीयांपर्यंत पोहोचला. डेरेक ओब्रायन यांनी दावा केला की, पंतप्रधानांनी पाठवलेल्या संदेशामुळे भाजपचा प्रचार झाला आहे.

• 17 मार्च – TMC खासदार साकेत गोखले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार दाखल केली. आंध्र प्रदेशातील पलनाडू येथील लोकसभेची जागा असलेल्या चिलाकालुरीपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप गोखले यांनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.