बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी यांना जे जमले नाही ते सावंत बंधूंनी करून दाखवले; तानाजी सावंतांचा दावा

114

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी  यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. ती किमया पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी करून दाखवली, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. या वक्तव्यातून सावंतांनी स्वतःची तुलना ठाकरे-वाजपेयी आणि अडवाणींसोबत केल्याची चर्चाही सुरू आहे.

पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी अशाप्रकारचे विधान केले आहे. मंगळवारी वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. या कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी आपल्या सभांना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी जमल्याचा दावा केला आहे.

तानाजी सावंत काय म्हणाले? 

तानाजी सावंत म्हणाले, सोलापूरच्या जनतेला माहित होते, जे पटांगण आपण सभेसाठी घेतले ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सभेला पूर्ण भरले नाही. आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा झाल्या. पण त्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी जमली नाही. अडवाणीजी यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. आमि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ मध्ये करुन दाखवली. सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली.

तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट करत एक दावा केला होता. ते म्हणाले होते की, २०१९ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून १५० बैठका घेतल्या नी आमदारांचे मन वळवले.

(हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.