मविआत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

79

शिंदे गट-भाजप युतीला बहुमताचा पाठिंबा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणात महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आपल्याला महाविकास आघाडीत असताना करता येत नसल्याची खंत बोलून दाखवली.

(हेही वाचाः कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला)

आम्हाला गप्प बसावं लागलं

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन चालत आहोत. पण शिवसेनेने हिंदुत्वाला विरोध करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सूत जमवले. त्यामुळे ते आम्हाला सहन होत नव्हते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बंड,उठाव करावा, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. पण गेल्या अडीच वर्षांत आम्हाला खूप वाईट अनुभव आला. काँग्रेस सोबत असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं. काँग्रेसने आपल्या शिदोरी या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली, तरी आम्हाला गप्प बसावं लागलं, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार म्हणून ही भूमिका घेतली आहे. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार. सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारचा विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला. विधानभवनाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली आहे.

(हेही वाचाः आता लिखापडी बंद, थेट कार्यवाही! मुख्यमंत्री म्हणाले सिस्टीम बदलणार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.