बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, जास्त लक्ष देण्याची गरज…

193
बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, जास्त लक्ष देण्याची गरज...
बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, जास्त लक्ष देण्याची गरज...

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बेपत्ता महिलांच्या तक्रारी आणि लव्ह जिहादचे प्रकरणे सातत्याने कानावर ऐकू येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी माध्यमांसोबत बोलले. फडणवीस म्हणाले की, ‘बेपत्ता महिलांच्या तक्रारींविषयी आम्ही खूप संवेदनशील आहोत. जर तुम्ही अहवाल पाहिला तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात महिलांचे शोध घेण्याचे प्रमाण ९० टक्के आहे, तर काही ठिकाणी ९५ टक्के आहे. असे असले तरी यात अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण सतत जी काही प्रकरणे समोर येत आहेत.’

‘कोणी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करेल, यावर कोणताही आक्षेप नसला पाहिजे. पण आता असे प्रकरणे समोर येत आहेत की, महिलांची एकप्रकारे दिशाभूल करून खोटी आश्वासने देऊन लग्न केली जात आहे. ज्या लोकांची आधी लग्न झाले आहे, ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत, असे दिसत आहे,’ असे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – ओडिशाच्या रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

तसेच यापूर्वी बालतस्करीविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘गृहखाते बालतस्करीच्या प्रश्नावर संवेदनशील असून या प्रकरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. महाराष्ट्राने बालतस्करीवर जेवढी कारवाई केली तेवढी कुठेही झालेली नाही. महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार रोखण्याचे काम राज्य सरकार करत आहे.’

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.