Sanjay Nirupam : काँग्रेसमध्ये ५ सत्ताकेंद्रे जे एकमेकांशी भांडतात; संजय निरुपम यांचा घणाघात

आधी मी राजीनामा दिला मग माझ्यावर कारवाई झाली, असा दावा संजय निरुपम यांनी केला.

143

काँग्रेसमध्ये पाच वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. आणि या पाचही जणांची स्वतःची लॉबी आहे जी एकमेकांशी भांडत राहतात. या पाच केंद्रांमध्ये सोनिया गांधी पहिल्या, राहुल गांधी दुसऱ्या केंद्रावर, प्रियंका गांधी तिसऱ्या केंद्रावर, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चौथ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल शेवटच्या क्रमांकावर आहेत. हे सर्वजण आपापल्या परीने राजकारण करत आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला.

काय म्हणाले निरुपम? 

काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे दुभंगलेला पक्ष असून त्याची विचारधारा दिशाहीन असल्याचेही पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी नष्ट होतील. काँग्रेस म्हणते की हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात काही गैर नाही. गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणत्याही धर्माला विरोध नव्हता. नेहरूजींच्या धर्मनिरपेक्षतेत हे बरोबर आणि हे चुकीचे होते. पण, आज नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची विचारधारा संपली आहे. काँग्रेस हे मान्य करायला तयार नाही. डावे विचारधारा घेऊन वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांनी स्वतःच संपवले आहे. राहुल गांधी यांच्या आसपास डावे लोक आहेत. हे लोक अयोध्येत श्रीरामाच्या अस्तित्वाला विरोध करतील. ते श्रद्धेवर विश्वास ठेवत नाहीत. रामलला विराजमान झालेल्या कार्यक्रमाला अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. पत्र मिळाले आहे आणि वेळ मिळाल्यास येईन असे सर्वांनी सांगितले. या उत्सवावर कोणीही प्रश्न विचारला नाही. हा भाजपाचा अपप्रचार असल्याचे एकट्या काँग्रेसने पत्र लिहिले. त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले, असेही निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले.

(हेही वाचा Navneet Rana: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले)

आधी राजीनामा नंतर कारवाई 

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे. मात्र, संजय निरुपम यांनी वेगळाच दावा केला आहे. आधी मी राजीनामा दिला मग माझ्यावर कारवाई झाली. माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होते. त्यामुळे मी बुधवार, ३ एप्रिल रोजी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. त्यानंतर तत्काळ माझ्यावर कारवाई करण्यात आली. राजीनाम्यातील माझे शब्द, माझ्या भावना पाहून त्यांना वाटलं असेल की हे प्रकरण खूप जास्त होईल. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कारवाई केली. म्हणजेच ए फोर साईजचा कागद काँग्रेसने बरबाद केला, असेही निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.