CM Eknath Shinde : महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

108
CM Eknath Shinde : महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde : महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली.

शनिवारी २२ जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७-लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, पूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नूषा वृषाली शिंदे, नातू रूद्रांश उपस्थित होते.

या भेटी दरम्यान कुटुंबीयांची पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासोबतच राज्याच्या सर्वंकष विषयांवर चर्चा करून राज्यात सुरू असलेल्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पाठबळ असल्याचे आश्वासक आश्वासनही यावेळी मोदी यांनी दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या घटनेबाबत सहवेदन मोदी यांनी व्यक्त करत या दुःखाच्या समयी केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती जाणून घेतली.

(हेही वाचा – इर्शाळवाडीतील मुलांची नोंद करा आणि त्यांना पुनर्वसनात त्वरित सामावून घ्या; नीलम गोऱ्हेंचे अधिकाऱ्यांना निर्देश)

धारावी प्रकल्पाची घेतली माहिती

– धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. यासोबतच प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान पंतप्रधानांनी व्यक्त केले.

– राज्यातील रखडलेले पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लावावेत. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे राज्यातील असे सर्व प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशाही सूचना मोदी यांनी यावेळी केल्या. तसेच राज्यात वांरवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचे होणारे नुकसान याबाबतही मोदी यांनी विचारपूस केली.

– कोकणात प्रचंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळविता येईल, यावर भविष्यात काही उपाययोजना आखता येतील का याबाबतही चर्चा करण्यात आली. मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनेबाबतची माहिती मोदी यांनी घेतली. यासह राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा याबाबतही विचारणा केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.