मुंबई महापालिका सर्वात मोठा घोटाळा – अमित साटम यांचा हल्लाबोल

105
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई शहर, परंतु पायाभूत सुविधा त्या दर्जाच्या आहेत का? मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट आयुक्त हे सध्याचे आहेत. मुंबई शहराला लागलेली ही कीड आहे. अमेरिकेत कोण आहेत त्यांच्याकडे पार्सल जाते. हा मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान कोण कोण येते? हे सीसीटीव्हीत चेक करा. असे सांगत याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. त्याचसोबत मुंबई महापालिकेचं ऑडिट करण्यात यावे अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केली.

विरप्पन गँग चालवतात 

विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मुंबई, एमएमआर विभागातील समस्यांबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. साटम म्हणाले की, BMC म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोल स्कॅम, टू जी स्कॅम, पीडब्ल्यूडी स्कॅम हे काहीच नाही. ३ लाख कोटीहून अधिक घोटाळा या मुंबई महापालिकेत झाला आहे. रस्ते, शाळा, उद्यान इतकेच नाही तर भंगारातही घोटाळा झाला आहे. रेमडेशिवीर इंजेक्शनसाठी मुंबईकर जनता वणवण फिरत होती. त्या कोविड काळातही सत्ताधाऱ्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला. २०२०-२०२२ या कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कळस आहे. याठिकाणीही महापालिका आयुक्तांच्या रुपात सचिन वाझे बसला आहे. वाझेगिरी करतात. अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त हे दोघे मिळून विरप्पन गँग चालवतात असा आरोप त्यांनी केला.

आदित्य ठाकरेंवर निशाणा 

पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करण्याचे पाप यांनी केले. बालहट्टामुळे मुंबईकरांच्या मेट्रोचे तिकीट जे १५ रुपयांना मिळणार होते ते २० रुपयांवर जाईल. कारण मेट्रो कारशेडचे काम थांबवल्यामुळे जवळपास हजारो कोटींनी प्रकल्प खर्च वाढला. पर्यावरणाचा ऱ्हास खऱ्या अर्थाने याच लोकांनी केला असे म्हणत भाजपा आमदार अमित साटम यांनी शिवसेनेला आणि आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. २०२१ मध्ये माझ्या मतदारसंघातील एसआरए प्रकल्पाच्या वादामुळे मी एसआरए कार्यालयात लोकांना घेऊन गेलो. लोक जेव्हा सीईओसमोर म्हणणे मांडत होते. तेव्हा ते अधिकारी म्हणाले तू कोण आहेस? गरिबांना घरं देण्याच्या निमित्ताने वसुली करायची होती. १९९९ ते २०१४ मुंबईत केवळ १ मेट्रो झाली. परंतु त्यानंतरच्या काळात २८६ किमी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांना जोडणारी मेट्रो प्रकल्प काम सुरू झाले. आरेचे कारशेडचे काम थांबवून मेट्रो काम रखडवले, असेही अमित साटम म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.