मुंबई महापालिका निवडणूक भाजपा-शिंदे गट एकत्र लढणार! शाहांकडून 150 जागांचे टार्गेट

80

मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी मुंबई महापालिकेत 150 जागांचे टार्गेट भाजपाला दिले आहे.

यावेळी शाह असेही म्हणाले की, राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असले पाहिजे, आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचही ते म्हणाले. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं 150 जागांचे टार्गेट असून, खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचे शाह म्हणाले.

(हेही वाचा – शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर! म्हणाले, “तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि…”)

अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अमित शाह म्हणाले, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही चालेल पण धोका सहन करू नका, जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. दरम्यान, 2014 मध्ये दोन जागांसाठी शिवसेनेनेच युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. शिवसेनेनेच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे त्यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.