यंदाच्या वर्षी राज्यात कर वाढ होणार का? काय म्हणाले अजित पवार?

85

प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी राज्यात कर वाढणार, असे संकेत पवार यांनी दिले. कोरोनामुळे राज्याला खूप मोठा फटका बसला आहे, असेही ते म्हणाले.

सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाची दोन वर्ष कठीण गेली

राज्यातील कोरोना परिस्थिती, राज्याचा अर्थसंकल्प, ओबीसींचे राजकीय आरक्षण या सर्व मुद्द्यांवर अजित पवार बोलले. पूर्वी फक्त सेल्स टॅक्स आणि एलबीटी होते. त्यानुसार टॅक्स गोळा करून महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती चालायच्या. नंतर त्याच्या तक्रारी वाढल्या. नंतर गेल्या काळात वन नेशन वन टॅक्स असा निर्णय झाला आणि जीएसटी आले. त्याला आता पाच वर्ष झाली आहेत. त्या पाच वर्षांच्या काळात केंद्र ठराविक रक्कम राज्यांना देत होते. ती आता बंद होणार आहे. सर्व राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोरोनाची दोन वर्ष कठीण गेली असून अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्या पाच वर्षांमध्ये अजून दोन वर्ष वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. आता त्यावर काय निर्णय घेतात ते पहावे लागेल, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा धक्कादायक : अ‍ॅमेझॉनने तिरंगा छापलेले विकले बूट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.