Chitra Wagh : उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्यानंतर चित्रा वाघ यांनी विचारले तीन सवाल

92

उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या मुलाखतीवरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना तीन खोचक सवाल विचारले आहेत.

काय म्हणाल्या चित्रा वाघ? 

पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत…सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र…दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…! असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला.

पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे? असा रोखठोक सवाल विचारला. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच ट्विट केले. उद्धवजी, तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे,  हे आम्ही जाणतो…पण त्याची झलक कुठं दिसली नाही राव. पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत…सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र…दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…! पण काही प्रश्नांची उत्तरं घ्यायची राहिली बघा…एखाद्या कणा असलेल्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर पोकळ बातांपेक्षा काही ठोस प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळाली असती…कोविड घोटाळ्यात कंत्राटं कोणी ओरबडली? कोविड घोटाळ्यात खैरातीसारखी कंत्राटं कुणाला वाटली? पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं? अलिबागचे 19 बंगले कुणाचे होते? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत, उद्धव जी … यावर कधी बोलाल? असा सवाल चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

(हेही वाचा Coal Scam : काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.